संस्कृत अभ्यासक. वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार. समाज माध्यमांत सातत्याने भारतीय तत्वज्ञान, संत साहित्य इत्यादी विषयक लेखन.
Book Summary
खरं तर एक वय असं असतं की, तेव्हा बहुतेक माणसं कवी किंवा कवियत्री असतात. त्या वयात कविता होत जातात.
त्यात निर्व्याजता असते. त्या वयातील ही सवय आयुष्यभर जपली, की कविता अकृत्रिम होतात. या काव्यसंग्रहातील
अधिकाधिक कविता या अर्थाने अकृत्रिम आहेत.
विशुद्ध प्रेम, मैत्री, अनुराग, स्नेह अशा भाव तरंगांना सामावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कविता आहेत. या
कवितेत ओढून ताणून आणलेले यमक नाहीत. तंत्र प्रधानता नाही. या कवितेत मनाचं प्राधान्य आहे.
ही कविता बुद्धीच्या फुटपट्टीने नव्हे, तर मनाने आस्वाद घेण्यासाठी आहे. म्हणून
तर या काव्यसंग्रहाला मनोज्ञा असे अभिधान दिले आहे.