Back to Book Details Report Reviews

नियतीचे लेखन


क्षणाचा भरोसा नाही, नशिबाचा खेळ कोण जाणे,
भोग भोगावेच लागतात, दैवापुढे कुठले बहाणे?

त्याच्याच मर्जीने येणे, त्याच्याच मर्जीने जाणे,
सुख-दुःख त्याच्याच हाती, मग कशाला रडगाणे?

जे होईल ते होऊ दे, बेफिकीर जगावे जगणे,
चिंता नको कशाची,
ज्याने चोच दिली तोच देईल दाणे.

येणे-जाणे हातात नाही, मिळेल ते स्वीकारा प्रेमाने,
राजा असो वा रंक, शेवटी सर्वांनाच आहे मरणे.

आज मिळाले जे जीवन, हसत-हसत त्याला जगणे,
उद्याचा भरोसा कुणाला? क्षणात बदलते सारे गाणे.

मूठभर मातीचा हा देह, कशाला त्याचा अभिमान करणे?
काळ आला की सारे सोडून, एकट्यानेच पुढे जाणे.

प्रविण ज्यो. तायडे
अमरावती

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu