पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

असेन मी नसेन मी परी असेल गीत हे

जीवनगाणे गातच रहाव

आज ६ जून,  कवयित्री शांताबाई शेळके यांची पुण्यतिथी.  यानिमित्ताने त्यांच्या काही गाण्यांच्या आठवण

साधारण जून महिन्याच्या  याच सुमारास मृग नक्षत्र लागते आणि नवनिर्मितीची चाहूल चराचराला होते.  एकंदर पुढचा वर्षा ऋतू चा कार्यकाल हा

" अजब सोहळा!  अजब सोहळा"

असा असतो मग अचानक केंव्हाही हा पाऊस येतो, तो मातीचा हवाहवासा वाटणारा गंध घेऊन

 " आला पाऊस मातीच्या वासात ग 

मोती गुंफीत मोकळ्या केसात ग"


मग दरवर्षी सारखे ते WA वर अत्तरांचे भाव कमी होतात पण या गंधाची अनुभूती घेतलेला नकळतपणे गुणगुणत

गगना गंध आला

मधुमास धुंद झाला

फुलते पलाश राणी

*जळत्या ज्वाला*


सभोवतालचा परिसर हिरवागार होऊ लागतो. मनुष्यप्राणी तर आनंदतोच पण रानपाखरं ही गाणी गावू लागतात.

सोनसकाळी सर्जा सजला,हसलं हिरवं रान

राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान

याचबरोबर

किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती !

*पानोपानी फुले बहरती, फुलपाखरे वर भिरभिरती !

आषाढ सरींचा जोर संपून श्रावणाची चाहूल लागते श्रावणसरींची, उन-पावसाच्या लपंडावाची

'कशी मनातुन मने गुंतती, भाव दाटती उरी

उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी

'जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी

कधी हास-या, कधी लाज-या, आल्या श्रावणसरी'


निसर्गाचे मग एक लोभस रुप सगळीकडे बघायला मिळते मग


'नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू

गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा

ऋतु हिरवा, ऋतु बरवा ||'


नारळी पोर्णीमा झाली की मग परत समुद्रात जाणाऱ्यांना मायेने सांगितले जाते

आज पुनवा सुटलय दमानं

दरियाच्या पान्याला आयलंय उदान

पिऊन तुफानवारा

माझ्या सारंगा, राजा सारंगा


तरीही वेळप्रसंगी 

सजनान होडीला पान्यात लोटलं

.. अन्


वादळंवार सुटलं गो

वा-यानं तुफान उठलं गो

भिरभिर वा-यात

पावसाच्या मा-यात

सजनान होडीला पान्यात लोटलं

वादळंवार सुटलं गो !

निसर्ग आणि मनुष्यप्राणी यांच्यातील रेशीम बंध असेच राहू देत


हे बंध रेशमाचे, ठेवी जपून जीवा

धागा अतूट हाच, प्राणात गुंतवावा

बळ हेच दुर्बलांना , देतील पराक्रमाचे

तुटतील ना कधी ही,  हे बंध रेशमाचे


शांताबाईंनी असंख्य गाणी लिहिली आहेत, कुणीही यावे आणी ओंजळीभरुन घेऊन जावीत आणि आपापल्या पध्दतीने

*"जीवनगाणे गातच रहावे "

यानिमित्ताने शांताबाईंचे स्मरण 

मंडळी, लेख आवरता घेण्यापुर्वी. 

६ जून म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ( तिथी जेष्ठ शुक्ल त्रयोदशी)  

शांताबाईंच्या या गाण्याने या लेखाची सांगता करतोय

शुभघडीला  शुभमुहुर्ती

सनई सांगे शकुनवंती

जय भवानी जय भवानी

दशदिशांना घुमत वाणी


जयजयकारे दुमदुमवू हे

सह्याद्रीचे कडे  !!


स्वराज्यतोरण चढे गर्जती

तोफांचे चौघडे

*मराठी पाऊल पडते पुढे!* 


स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे

पिटावे रिपूला रणी वा मरावे

तुझ्या रक्षणा तूच रे सिध्द होई

तदा संकटी देव धाऊन येई


 *जय जय रघुवीर समर्थ*

अमोल केळकर 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू