गुरू
बोबडे बोल सुधारत माझे
मनी संस्कार रुजवले ,
चुकल्यावर कान पकडून
योग्य वेळी रंगवले ...
बोट धरून चालण्याची
माझी केली सुरवात,
त्यांनीच शिकवले संकटांवर
कशी करावी मात ...
हात पकडून त्यांचा मी
अ, आ,इ चे धडे गिरवले ,
थाप मिळताच शाबासकीची
मी त्यांचेच नाव मिरवले ...
ज्यांनी दिला माझ्या
ओल्या मातीला आकार ,
त्यांनीच केले माझे
साधेसे जीवन साकार ...
दिली ज्यांनी शिजोरी
अनुभवांची आयुष्यभरासाठी ,
खात्री ने सांगते ते गुरू
सदैव माझ्या पाठी ...
या सर्वांमुळेच झालीय माझी
योग्य वाटचाल सुरू ,
आज ऋणी मी मानते की
धन्य ते गुरू ,
की धन्य ते गुरू ...