जयभीम म्हणायला वाटतो मला गर्व ...
चौदा एप्रिलला जन्मले भीमराव ,
शिकून मोठे जगात केले त्यांनी नाव .
किती आली दुःखे , किती आली संकटे ,
भीमराव लढले सर्वांशी एकटे .
गळ्यामध्ये आमच्या वाडग झाडू राही पाठी ,
खूप संघर्ष केला आम्ही जगण्यासाठी .
भीमरायांनी आम्हाला माणसात आणले ,
माणुसकी हाच धर्म हेच त्यांनी जाणले .
शिका , संघटित व्हा , संघर्ष करा ,
त्यांनीच दिला हा मूलमंत्र खरा .
भीमरायांमुळे आम्हाला मिळाला मान ,
म्हणून म्हणतो तुम्ही पण वाचा संविधान .
भीमरायांनी आमच्यासाठी केले होते सर्व ,
म्हणून जयभीम म्हणायला वाटतो मला गर्व .
भीमराव नसते तर आम्हीपण नसतो ,
गावाबाहेर कुठेतरी भटकत असतो .
© धनराज संदेश गमरे