अधरी अमृत नयनी पाणी
ळी रुपाने समाज एकत्र येऊ लागला तेंव्हाही सर्व निर्णय स्रीच घेत होती . आपला डेरा कुठे टाकायचा ? कोणती वस्ती आपल्याला योग्य होईल याचे सर्व निर्णय स्त्रीच घेत होती व तीला कुटूंबात व समाजात आदराचे स्थान होते .
कालांतराने ही समाजव्यवस्था पुरुष प्रधान होत गेली . पुरुष घराबाहेर पडून कुटुंबाच्या उदरनिर्वाहा पुरते कमवायला लागला आणि स्रीयांना चूल आणि मूल यांची जबाबदारी देवून उंबर्याच्या आतच बंदिस्त करुन ठेवण्यात आले .
तिच्यावर अनेक बंधने घालण्यात आली . तरी ती ते निमूटपणे सहन करीत आली . पुरुषांनी तिच्याकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून सतत पाहिले . रामायण महाभारत कालापासून तीची विटंबना होत आली आहे .
यत्र नार्यस्तू पुज्यंते , रम॔ते तत्र देवता: |
यत्रेतास्तू न पुज्यंते सर्वास्तआफला: क्रिया :||
जिथे नारीचा सन्मान केला जातो , तिला सुखात आनंदात ठेवले जाते त्या घरात प्रत्यक्ष परमेश्वराचा वास असतो . ते घर सतत आनंदी राहाते . या उलट जिथे स्त्रियांवर अन्याय , अत्याचार होतात ते घर तो समाज कधीही सुखी होणार नाही .
आज आपण समाजात जे चित्र पाहातो आहोत खूप निराशाजनक आहे . दररोज , बलात्कार , अत्याचाराच्या बातम्या ऐकू येत आहेत , रोज घटस्फोट होत आहेत . आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी , ती घराबाहेर पडते तेंव्हा वखवखलेल्या कामूक नजरा तीच्या शरीराचे लचके तोडीत असतात . गर्दीत लागलेला