हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
|| या अभंगात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी दोषांच्या होळी विषयी सांगितले आहे. ||
दैन्य दुःख आम्हां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥
आमचे दोषांची होळी होते, जसे “ हरि उच्चारणी अनंत पापराशी | जातील लयासी क्षणमात्रे” आणि म्हणून दैन्य आणि दुःख आमच्या जवळ येत नाहीत.
सर्व सुखे येती माने लोटांगणी । कोण यांसी आणी दृष्टीपुढे ॥२॥
सर्व सुखे स्वतःहून आमच्या जवळ लोटांगण घालतात, पण आम्ही त्यात बद्ध होत नाहीत.
आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचे॥३॥
आम्हाला दोनच गोष्टी आवडतात, एक तर संतांचा सहवास आणि विठोबाचे नामस्मरण.
आमुचे मागणे मागो त्याची सेवा । मोक्षाची निर्देवा कोण चाड॥४॥
आम्हाला मोक्ष नको, तर विठोबाची सेवा आम्ही मागतो.
तुका म्हणे पोटी सांठविला देव । न्यून तो भाव कोण आम्हां॥५॥
आम्ही पोटात देव साठविला आहे, त्यामुळे आम्हाला न्यूनगंड नाही.
सर्वांना हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
माऊली की जय जय श्रीकृष्ण!!!
ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर