पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिवस स्वतंत्र्याचे

"  बलसागर भारत होवो…. 

                      विश्वात शोभुनी राहो…"

 

 आज या गाण्याचे बोल प्रत्यक्षात उतरल्याचं दिसत आहे..

 

 

काळाबरोबर  चालत आपल्या देशाने  पावले टाकायला सुरुवात केली. म्हणूनच आपल्या भारत देशाची प्रगती जगामध्ये सर्वतोमुखी आहे एक विकसनशील देश, एक होऊ घातलेला प्रगत देश…जगाची केवळ 75 वर्षामध्ये आपल्या भारत देशाचे नाव जगात सर्वतोमुखी घेतले जात आहे

आणि हा आपल्या देशाचा गर्व गौरव आहे पर्यायाने सर्व देशवासीयाचा गौरव आहे आणि त्याकरता देशवासीयांनी अभिमान आहे…

 

 

स्वातंत्र्य प्रत्येक मनाला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला पाहिजे प्रत्येक समूहाला पाहिजे …आपल्या देशात अनेक धर्मपंथ समूहासमूहाने राहणारे लोक आहेत.. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य इंग्रज स्वातंत्र्य मिळायचे होते त्यावेळेस या सर्व धर्म पंथीयांच्या लोकांनी एकजुटीने प्रयत्न करून देशाच्या स्वातंत्र्य त्या चळवळीत भाग घेतला होता..

 या सगळ्यांच्या प्रयत्नाने, एकजुटीने आणि  बलिदानाने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले, आणि एक एकजुटीनेच आतापर्यंत  स्वातंत्र्य टिकून आहे . परंतु आजकाल प्रत्येक मनाला, व्यक्तीला समूहाला स्वातंत्र पाहिजे पण नेमका स्वातंत्र्य म्हणजे काय या गोष्टीची जाणीव त्यांना नाही.. त्यांना हे कळत नाही की यामुळे आपली एकजूट दिसत नाही.. त्यामुळे परकीय शक्तीला आपल्यामध्ये फूट पाडण्यात काहीच वेळ लागणार नाही.. भले तुमचे आपसात मतभेद असले तरी पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वांनी आपल्या देशात स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एकजुटीने  उभं दिसायलाच हवं…

 

   आता आपण बघतो की  बहुतांशी मनाला मिळालं स्वातंत्र्य मिळालं आहे.. प्रत्येक जण स्वातंत्र्याच्या गप्पा करत वाहवत चालला आहे..  रूढी परंपरेच्या, अंधश्रद्धेच्या पगड्या खालून बाहेर निघतांना दिसत आहेत…

      भारताच्या प्रगतीच्या सर्व क्षेत्रात स्त्रिया या अग्रेसर होताना दिसत आहेत, जगात आपलं आणि पर्यायाने आपल्या देशाचा नाव उंचावत आहे..

 

देशाचा विकास हा कुणाला एकट्याने होत नसते त्याला साथ लागते देशवासीयांची आणि देशभक्ती ,देश प्रेम हे मनात मना मना मनात आहे म्हणूनच आज आपला भारत देश प्रगतीपथावर आहे हे मान्य करायला हवे…त्यामुळे आज शत्रुराष्ट्र आपल्या देशाकडे डोळा वर करून  बघण्याची हिंमत करत नाही..

 

  देशाचं सैन्य देशाच्या सीमांची रक्षा करतं पण देशांतर्गत नागरिकांना जाण असायला हवी की आपलं स्वातंत्र्य अबाधित कसं ठेवावं याची.. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण आपला देशप्रेम ,आपल्या देशाबद्दलची आत्मियता प्रकट करू शकतो…. आपला परिसर स्वच्छ ठेवणे पाण्याची बचत करणे, इंधनाचा वापर कमी करणे ही  छोटीशी गोष्ट ही आपल्यासाठी वआपल्या देशासाठी करतो… पण याची आपल्याला जाणीवही नसते…

 

1936 झाली जेव्हा ऑलम्पिक मध्ये भारताने हॉकी खेळामध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं त्यावेळी जर्मन राष्ट्राध्यक्ष हिटलरने मेजर ध्यानचंदला जर्मन आर्मी जॉईन करण्याची ऑफर दिली होती.. पण मेजर ध्यानचंदानी त्यांना एका शब्दात सांगितलं की. 

 

 

        Indian is not sale

 

त्यावेळी हिटलर ने त्यांना म्हटलं होतं की जर्मनदेश  तुला तुझ्या देश प्रेमासाठी तुला सॅल्यूट करते…

 

 

आपण स्वातंत्र स्वतंत्र भारतात राहतो हे आपल्यासाठी अभिमानाची, गर्वाची आणि भाग्याची गोष्ट आहे, म्हणून देशप्रेम रुजवण्यासाठी आपलं देशासाठी असलेलं कर्तव्य काय याची जाणीव असण्यासाठी आपण पुढच्या पिढीलाही त्या दृष्टीने मार्गदर्शन करायला हवं…

 

चला देशवासीयांनो विकसित भारतालच्या प्रगतीला साथ द्या.. 

 

              सबका साथ सबका विकास

 

 

  हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे ..                         हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र भारताचे

 

जयहिंद!!!!

 

 सौ.ज्योती अलोणे 

 (ज्योर्तिमयी)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू