अनामिका वाघ - (27 November 2024)अत्यंत प्रभावशाली लेखन..आजकाल ची मुलं technology वर जास्त भर देत आहेत तिच्याकडेच वळत आहेत..आई वडिलांचं ऐकत सुद्धा नाही पालक पण काय करणार..आजुबाजूच वातावरणच तस झालंय त्यांच्यासाठी.. खरं बालपण तर आपण जगलोय आताच्या पिढीच्या नशिबात नाही ते..पण पालकांनी मुलांना व्यावहारिक technical ज्ञानासोबत थोडा भावनिक आणि अध्यात्मिक ज्ञान सुद्धा द्यायला हवे तेव्हा कुठे मुलं भविष्यात काहीतरी चांगले काम करून आजकालच्या पिढी ला प्रेरित करू शकतात
SAROJINI BAGADE - (20 November 2024)सुंदर लिहिलंय..पण आता ही पिढी त्यांच्या डिजिटल दुनियेत इतकी पुढे निघून गेलीय की आपला काळ, विचार, भावना हे त्यांना लगेच नाही कळणार...आणि आत्मसात ही नाही होणार...प्रत्येक पिढीत बदल होतात तसे या पिढीतही झाले...माघारी येणे शक्य नाही त्या पिढीला....आपण मोठी स्वप्नं बघताना मुलांचा काल कसा होईल याचा विचार केला नाही कदाचित असेही असू शकते. .असो मी हे माझे विचार मांडलेत...
13
Maya Mahajan - (20 November 2024)मुलांचे भावनांक वाढीस लावण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करणे जरुरी आहे.
11
Mrudula Kulkarni - (20 November 2024)आभासी जग गतिमान आहे,बुद्ध्यांक वाढवणारे असेलही..पण जगण्यातली हार-जीत दोन्ही समान मानण्यासाठी लागणारी भावनिक प्रगल्भता देण्यास असमर्थ आहे.तीच नसेल तर मग आजचे वास्तव स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही.उत्तम लेख.कागज़ की कश्ती ..बारिश का पानी..आपण आपले रम्य बालपण आठवत राहायचे.
12
Shilpa Dhomney - (20 November 2024)एक नंबर आपण मांडलेले विचार पटले पण प्रत्यक्षात यावर काम करण अवघड होऊन बसलंय.