वेडं नावाप्रमांणेच वाचकांना खरंच वेडं लावणारा हा लेखांक म्हणजे
वाचकांसाठी खरी पर्वणीच म्हणावी लागेल. वेड यां लेखांकात समाविष्ट करण्यात
आलेला ब्ला ब्ला ब्ला सारखा लेख आपल्याला हसून हसून पोट धरायला
लावणारा आहे, पुणे मुंबईकर की नागपूरकर म्हणजे माणसांची पुरेपूर ओळख
वाटते. ही रात्र सुगंधाची म्हणजे अबोलपणाची आर्तहाक की निशिगंधाची अपूर्वाई
हा खरंच प्रश्न पडतो. मी कां विसरतेम् हणजे हळुवार आपल्याच माणसाने घेतलेली
फिरकी वाटते , की वयोमानाने होणारी चूक भूल माफ..
देवं भेटला मला सारखा लेख वाचताना आपल्याला देव्हाऱ्यातल्या देवा
सोबतच, रोजच्या सहवासातल्या, आपल्याच संपर्कातली कित्येक अनुभवातून देवात्म देऊन जाणारी अवती भवती ची माणसं ह्याची जाणीव करून देते.
भारती ताईंच्या लिखाणाचं हेच तर खरं वैशिष्ट्य असतं की, वाचक नुसता
वाचत सुटतं नाही, तर प्रत्येक लिखाणा सोबत मनोरंजन, विनोदच नाही तर किती
तरी अर्थपूर्ण, बोधपर लिखाण असतं.