✒️ शब्दांमध्ये इतिहास, राजनीती , प्रसंग आणि तत्त्वज्ञान जगणारा एक लेखक!
मी लेखनातून रामायण, महाभारत, आणि इतिहासातील महान प्रसंगांना नव्याने उलगडतो. संवाद हे केवळ वाक्य नसतात, ते निती, कूटनीती आणि विचारशक्तीचा आरसा असतो—आणि तोच दृष्टीकोन माझ्या लेखनात उमटतो.
शब्दांच्या शस्त्राने...More
✒️ शब्दांमध्ये इतिहास, राजनीती , प्रसंग आणि तत्त्वज्ञान जगणारा एक लेखक!
मी लेखनातून रामायण, महाभारत, आणि इतिहासातील महान प्रसंगांना नव्याने उलगडतो. संवाद हे केवळ वाक्य नसतात, ते निती, कूटनीती आणि विचारशक्तीचा आरसा असतो—आणि तोच दृष्टीकोन माझ्या लेखनात उमटतो.
शब्दांच्या शस्त्राने विचारांना धार देणे, हीच माझी खरी ओळख!
Book Summary
धोंडवाडी गावात निवडणुकीत नाही, तर सावलीत सत्ता चालते. राजाभाऊ देशमुख – गावचा चतुर पण क्रूर नेता – जमीन, माणसं आणि सत्य यांच्यावर हुकूमत चालवतो. एका पत्रकाराचं गायब होणं आणि एका शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू या घटनांनी गावात गूढ वातावरण पसरतं. परदेशातून परतलेली त्याची मुलगी संजना ह्या सगळ्यामागचं सत्य उघड करू लागते. बनावट कागदपत्रं, खोट्या सही, आणि काळ्या डायऱ्यांमधलं सत्य उलगडत जातं…
सत्तेच्या विरुद्ध रक्ताचं नातं उभं राहतं.
ही कथा आहे सत्ता, अन्याय आणि अंतरात्म्याच्या लढाईची – जिथं शांतता म्हणजे भीती असते, आणि सत्याची किंमत