....मध्यमवर्गीय घरात आपण सुरक्षित असतो आणि मुलं ही..। कष्ट करून पैसे कमवायचे, मुलांवर चांगले संस्कार करायचे , त्यांना उच्च शिक्षण द्यायच आणि कोणावर अबलंबून रहायला नको म्हणून वृद्धापकाळाची सोय करून ठेवायची.. अस साधं आयुष्य जगणारे आपण..
आपल्याला बाहेरच भयंकर जग कस असत ह्याची फार कल्पना नसते.. बातम्या ऐकतो, शहारतो, रागावतो, काहीतरी करावस वाटत असते म्हणून दान धर्म करतो..
असच साधं आयुष्य जगलेल्या रुचीला , अविनाश, रोमीला हा खूप मोठा मानसिक धक्का होता.. मती गुंग झाली होती.....