"कोरोना काळात अशी परिस्थिति निर्माण झाली , भिती वाटली होती की कोणाला कोरोनाची लागण होताच – त्याच्याशी अंतर बनवून घेतले जायचे. कोणी त्याची मदत करायला तयार होत नव्हतं , अर्थात ह्याला अपवाद पण होते ज्यांनी त्या काळातही मदतीचे हात वाढवले. तसेच रोजनदारीवरचे मजूर , लाकडाऊन मुळे काम बंद, पैसा नाही , पाई-पाई जायला पण पोलिसांच्या काठ्या खाऊन घरी जायचे . अश्या कथांचा अनुवाद आहे. ह्या व्यतिरिक्त एक कहाणी अशी की—कोणत्या घटणेमुळे एक विचार ,एक धारणा मनात रुजू होते. ती अशी की—सुंदर स्त्री व्यवस्थित संसार थाटू शकत नाही. ह्या घाटणी ची कथा आहे- धारणा चे दंश . हीरो म्हणून कथा एक मुक प्राण्याची , डॉगीची आहे , जो एक नवजात अर्भकाचा जीव वाचवतो. एकूण पांच कथांचा अनुवाद केला आहे . ही माझ्या साहित्यिक गुरु ( जहीर कुरेशीजिं ) ला मी भावांजली वाहिली आहे .
कथा-कथा पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात जहीर कुरेशी जीच्या अनुदित कथा आहे आणि दुसर्या भागात मी माझ्या पाच मराठी कथा दिल्या आहे.-रामचन्द्र किल्लेदार
"