आपल्या मनात येणाऱ्या भावनांना शब्दबध्द करणे ही एक स्वतंत्र कला आहे, ते एक वेगळे विश्व आहे. लिहिता वाचता तर अनेकांना येत असते. पण विचार छापून यावेत अशा रीतीने त्यांची मांडणी करणे हे सर्वांनाच जमते असे नाही. लोक नाक्यावर उभे राहुन, गाडीत, बस स्थानकावर, पारावर बसून विविध विषयांवर बोलत असतात. मात्र ते कागदावर व्यवस्थित उतरवणे, योग्य त्या प्रकारे मांडणे, त्याचे साहित्यिक अथवा छापील मोल जाणणे फार कमी लोकांना जमते. असे लोक पत्रलेखक, पत्रकार, कवी, लेखक होऊ शकतात. श्री. अनंत देविदास बोरसे हे त्यातीलच एक. त्यांना समाजात काही अयोग्य, चूकीचे, गैर, असंबध्द दिसले की ते अस्वस्थ होतात. ही अस्वस्थता ते लेखनातून व्यक्त करतात.. .
असेच काही अर्थपूर्ण लेख या पुस्तकात संकलित आहेत