//...आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. नदीच्या प्रवाहा प्रमाणे ते धावत असत. गुणवत्तेवर कोणत्याही वर्गाची मक्तेदारी नाही. कोणतेही ज्ञान कोणत्याही वयात माणूस ग्रहण करू शकतो. निसर्गाच्या पंचतत्वावर प्रत्येक जीवाचा समान अधिकार आहे. प्रत्येक माणूस स्वत:ची कला सिद्ध करू शकतो. हेच जीवन आहे, प्रत्येक माणसात सुप्त गुण लपलेले असतात. प्रत्येक माणसात कलाकार लपलेला असतो. स्वत:च्या क्रियाशीलतेवर कार्य क्षमतेवर स्वत: विश्वास ठेवला पाहिजे.
जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय
अशी अवस्था मानवी मनाची आहे. स्वत: स्वत:ला श्रद्धांजली म्हणून काय लिहिणार? ही कल्पना करून पहिली तर मानवी अहंकार क्षणार्धात गळून पडतो हे वैश्विक सत्य आहे... //