भाषांतर म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नसून मुलीला माहेरातून सासरी पाठवण्याची कसरत आहे आणि यासाठी एकाग्रता ,तपश्चर्या व प्रामाणिक प्रयत्न या साऱ्याची एकसाथ गरज असते. मंगलाजींच्या गुणी आणि अणूपासून ब्रह्मांडापर्यंतचा आशय दडलेल्या कथा हिंदीतून मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘नवीन संभावना’ या मराठी पुस्तकाचे शिवधनुष्य सुषमाजींनी समर्थपणे पेललेले आहे हे या शंभर कथा वाचताना वाचकांना सहजच कळून येईल.
-प्रा. डॉ. श्रीकांत तारे