या लेखांमधून अनेक प्रकारचे क्षण आपल्या भेटीत येतात. या क्षणांच्या अनुभूतीने मनाचा कप्पा भरून गेला. यात कधी प्रेमाचे, कधी विरहाचे, कधी मखमली, कधी काटेरी, कधी यशाचे, कधी अपयशाचे, कधी सोनेरी, कधी रूपेरी तर कधी मिट्ट काळोखाचे, कधी मातृत्वाचे तर कधी इतर नात्यांनी ओथंबलेले, कधी मांगल्याचे, कधी निराशेचे, कधी भरभरून सुखाचे तर कधी न भरून येणाऱ्या दुःखाचे असे अनेकविध क्षणांना लेखिकेने आपल्यासमोर साकार केलं आहे.