स्मृतीगंधाची फुले या संग्रहातील कविता नावाप्रमाणेच आठवणींचा गंध दरवळत ठेवणा-या अनुभूतींची फुले आहेत.!
. स्त्री जीवन हे वयाच्या विविध वळणांवर जसं सामोरं जातं..तसतसे अनुभव तिला येतात.कवयित्रीने हे सगळे अनुभव संस्काराच्या संयमी आणि नितळ मनाने घेऊन ते अतिशय तरल आणि मनस्वी शब्दांत मांडले आहेत..ते मांडताना कुठेही भावनांचा अतिरेक, आक्रस्ताळेपणा येऊ न देता हळुवार फुल उमलावे तसाअतिशय तरल अनुभव वाचताना येतो..!