मनातील भावनांचे , विचारांचे अनुभवांचे अस्फूट हुंकार म्हणजे वैचारिक लेख होय. प्रत्येकाची ग्रहण शक्ती, विविध स्तरावरचे अनुभव विचारांमध्ये प्रतीत होत असतात. मग त्यामध्ये कधी प्रेरणा, कधी उपदेश, कधी योग्य दिशा
मार्गदर्शन , ज्याच्या त्याच्या कला नेत्याला प्राप्त होत असते. कधी सकारात्मक,
तर कधी आव्हान, तर कधी सडेतोड उत्तर या सर्व स्तरांनी वैचारिक प्रगल्भता स्पष्ट
होत जाते. स्वतःची वैचारिक शक्ती पूर्णपणे पणाला लावून, लेखक स्वतःच्या विचारांशी समरस होत असतो. मग या मध्ये कधी न पटणारे विचारही असतात. त्या विचारांच्या पातळीचा लेखकाचा सखोल अभ्यास असतो. तेव्हा तर लेखणी द्वारे एकेक शब्द त्याच्या लेखातून प्रगट होत राहतात.
'निरभ्र' या वैचारिक लेख संग्रहामध्ये, अशाच सर्व अनुभवांचे चित्रण मांडले
आहे. प्रत्येक गोष्टीचा सर्वांगीण पातळीवरचा विचार, हेच याचे ठळक वेगळेपण म्हणता येईल.