विचार-विविधा "हे माझे विद्यमान पाचवे पुस्तक ! माझ्या वरील प्रत्येक पुस्तकाची निर्मिती माझ्या विचाराशी निगडित असल्यामुळे माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या शीर्षकात 'विचार' हा शब्द अनिवार्य असायला हवा अशी माझी सुरुवाती पासूनची भावना होती व आहेत्यामुळे माझ्या सर्वपुस्तकांना शीर्षक देत असताना ही बाब मी अधोरेखित केली. या पुस्तकाचे दुसरे व महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक लिहीत असताना सामाजिक जीवनातील कोरोनाचा प्रकोप बऱ्याच अंशी कमी झाला आहेव समाज पूर्वीप्रमाणे मोकळा श्वास घेताना दिसतो आहे.
माझी पुस्तके वाचल्यानंतर वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या, काहींनी
फोनवरून, काहींनी व्यक्तिशः भेटीत तर बहुतेकांनी फेसबुकवर लेखांच्या शेवटी
कमेंटच्या स्वरूपात ! काही वाचकांनी माझे फेसबुकवरील बरेच लेख शेअरही केले
त्यामुळे भरून पावल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली व आपण लेखन
चालू ठेवावे अशी उर्मी माझ्या मनात निर्माण झाली. माझ्या आयुष्यात आलेले अनुभव जसे आठवतात त्या प्रमाणे लेखांच्या माध्यमातून शब्दबद्ध करून पुस्तकाच्या रूपानेवाचकांच्या पुढ्यात मी सादर केले. ज्या सामाजिक जाणिवा मला ठळकपणे दृष्टीक्षेपात आल्या त्यादेखील गुण-दोषांसाहित मी वाचकांच्या पुढे
लेखांच्या माध्यमातून मांडल्या.