निवृत्तीनंतर बराच मोकळा वेळ मिळतो. अनेक कडू गोड आठवणी मनात पिंगा घालत असतात. लक्षात राहणारे प्रसंग, काही मनाला उभारी देणारे तर काही मनावर चरे उमटवणारे असतात. बऱ्याच व्यक्ती आपल्या जगण्यावर बरा, वाईट परिणाम करणाऱ्या असतात .या सगळ्यांचा आपल्या जगण्यावर, हवा असो किंवा नसो परिणाम होतोच. त्यामागे काहीतरी कार्यकारण भाव असणारच. तो मी
तपासून पाहते. गीतेत सांगितल्या प्रमाणे तुमच्या जीवनात काय घडणार हे आधीच ठरलेले आहे. खरोखरच त्याची प्रचिती येते .
अशा छोट्या छोट्या घटना, व्यक्ती, यांच्या विषयीच्या आठवणी मी शब्दबद्ध केल्या आहेत. माझा दुसरा 'भावमुद्रा' हा लेखसंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी मी आशा करते.
- शुभदा पाटकर