जसे आंब्याची डाळ , भेळ हे असे अनेक चवी एकत्र आलेले पदार्थ अत्यंत आवडीने खाल्ले जातात, अगदी भूक नसतानाही खाल्ले जातात तसेच ही कलाकृती पण अत्यंत चविष्ट आहे. सारगर्भित पण हलक्याफुलक्या रूपककथा, स्वैर-अनुभवकथन आणि सहज सोप्या शायरी सारख्या कविता रसिकाला अनेक चवी -अभिरुचींचा दमदार अनुभव देण्यास सक्षम आहेत. उच्चविद्याविभूषित सामाजिक आध्यात्मिक अनुभवसंपन्न लेखक डॉक्टर मयूर भोईटे आणि समाजाला सुंदर बनविण्यासाठी जीवन अर्पण करणाऱ्या सुवर्णदिदी यांच्या जीवनाच्या अनुभवातून साकारलेली ही कलाकृती. नुसतेच उथळ लेखन नव्हे आणि बोजड तत्त्वज्ञान ही नव्हे तर जीवनाच्या मर्मबंधांना हळुवारपणे "वळणावळणा"ने स्पर्श करणारी ही कलाकृती. उघडून वाचण्याचाच आणि आस्वाद घेण्याचाच काय तो (चविष्ट?) अवकाश !