ही "काव्यसुमनांची ओंजळ" जशी ईश्वराला समर्पित आहे, तशीच ती निसर्गाशी सुद्धा तादात्म्य साधणारी आहे. "निसर्गाची नवलाई", "रम्य सायंकाळ" वगैरे निसर्ग कविता ह्या संग्रहाची शोभा वृद्धींगत करतात. कधी महाडकर सरांचे कवीमन "निसर्गाची नवलाई" टिपते, तर कधी एखाद्या "रम्य सायंकाळ"चे वर्णन करताना ते लिहितात...
निळ्या अंबरी शीतल सुंदर चंद्रकोर ही सजली
त्याच्या सोबत शुभ्र चांदणी शुक्राचीही नटली
वाऱ्यासंगे गंध जुईचा छान दरवळत आला
समीप बसली प्रिया लाजुनी भास मनासी झाला