"रामायण"म्हणजे काय?
तर..
रामायण म्हणजे संस्कृती
रामायण म्हणजे संस्कार
रामायण म्हणजे सद्सद्विवेक बुध्दी
रामायण म्हणजे सुयोग्य जीवनमूल्ये
रामायण म्हणजे न्यायाचा अन्यायावर विजय
रामायण म्हणजे नात्याची जपणूक
रामायण म्हणजे कर्तव्य परायणता
अथांग महत्व म्हणजे रामायण.जे एका संज्ञेत बसणार नाही ते म्हणजे रामायण.रामायण म्हणजे राज्य कसं असावं? राजा कसा असावा? नाती कशी असावी आणि ती कशी जपावी याचं ढळढळीत उदाहरण.
रामायणातील प्रत्येक पात्र काही तरी बोलतं. आपणास सुचवतं . प्रतिमाने ठरावित इतकी ती पात्रे सामर्थ्यशाली आहेत. अशाच पात्रांचं शब्दात चित्रण ,ते ही विविध लेखन शैलीतून आपणा समोर आणतांना मनस्वी आनंद होत आहे.
-सौ. भारती भाईक