स्त्री मुक्ती, पुरुष, निसर्ग, मराठी भाषेचे कौतुक, चारी ऋतू अश्या अनेक विषयांचे वर्णन अतिशय सुंदर शब्दांत केले आहे. भाषा शैली खूप सहज, सुंदर आणि हृदयस्पर्शी आहे. अगदी हळूवारपणे प्रेमाने प्रत्येक विषयाचे वर्णन खूप सहजपणे साकारलंय.
शेवटी तर आयुष्याचा धडा अगदी सहजतेने शिकवला आहे.
आयुष्यात प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास अनुभवताना, जीवन ही एक अडथळ्यांचीच शर्यत असते.... आणि रसिकांनो ह्या अडथळ्यांना बुद्धीच्या युक्तीने पार करत वाटचाल करायची.... अडथळे कधीच संपत नाहीत.... हे लक्षात ठेऊनच चालायचे....
“माणसाच्या हृदयाचे दार आतून उघडते. पण ते समजून घेणारं हृदय ही
आतून उघडलेलं असलं पाहिजे आणि त्या साठी त्याला 'स्व' विसरून जगावं
लागतं.” इतक्या सुंदर शब्दांत सखोल वर्णनाचे लेख लिहिले आहेत. फारच
सुंदर आणि प्रगल्भ लेखन. प्रत्येकाने वाचावे असेच. प्रत्येक लेखाचे वैशिष्ट्य
वेगळेच...