काव्य किंवा साहित्य म्हटलं की 'शब्दस्पर्श' आलाच. 'शब्दाची
किमया' आलीच त्यावरही शब्दरूपी रेखाटन के ले. समाजाविषयीचे भानही
ठेवले "सामाजिक ऐक्य" या काव्यातून. तसेच बळीराजा शेतकरी त्याच्या
व्यथा ही " शेतकरी आत्महत्या" आणि "शेतकरी राजा" या काव्यातून व्यक्त
केल्या. "अजूनही" ही कविता माणुस किती आशावादी असतो ह्याचा निर्देश करते . "किट्टू "हेकाव्य आणि तेनावही फार मजेशीर आहे. "मी पणा " ही कविता खरोखर वास्तववादी आहे, माणसाला खाडकन जागं करणारी रचना आहे.
असा सर्वसमावेशक निसर्गकाव्याने
शब्दाने नटलेला असा "हृदयस्पर्शी शब्दवेली" ह्या काव्यसंग्रह आहे.