सारांश:
आपल्या हिंदू धर्मा मद्धे वृक्षांना खूप महत्व दिले गेले आहे. कारण पूर्वजांना वृक्षांची माहीती व उपयोग माहिती होते. त्यामुळे त्यांनी वृक्ष व देवतांची सांगड घातली होती. जसे की, गणपती बाप्पाचा शमी, श्री दत्तात्रेयांचा अश्वथ (औदुम्बर), श्री शंकराचा बेल व रुद्राक्ष इत्यादी. ज्यामुळे लोकांनी त्याचे जतन करावे. पुस्तकात वेद काळापासून हिंदू धर्मात वर्णन केलेल्या दहा वृक्षांची सविस्तर माहिती त्यांच्या आध्यात्मिक व पौराणिक संदर्भा सह दिली आहे. तसेच त्याचे उपयोग व औषधी गुणांचाही उहापोह केला आहे.
या वृक्षांचे आधुनिक काळात असणारे पर्यावरणातील महत्व अधोरेखित केले आहे. जसे की वटवृक्ष व पिंपळ यांचे ऑक्सिजन निर्माण करण्याची व वातावरणात सोडण्याची क्षमता सांगितली आहे. करोना काळात सर्व जगाने याचा अनुभव घेतला आहे.
वेगवेगळ्या पुराणिक ग्रंथात असलेले संदर्भ ही उद्धृत केले आहेत. अशा प्रकारची एकत्रित केलेली माहिती क्वचितच उपलब्ध असते. त्या दृष्टीने हे पुस्तक संदर्भ म्हणून वापरता येईल. वाचकांना हे पुस्तक आवडेल अशी खात्री आहे.