जगावी जगून लिहावी आपल्या कविता बोलक्या व चिरंतन सत्याचा अविरतपणे ध्यास घेणाऱ्या आहेत. सर्वच कविता साध्या सरळ सोप्या भाषेत असल्याने वाचकांच्या थेट हृदयाला स्पर्शून जातात. सामाजिक आशयाच्या रचना समाजमनाला समुपदेशन तर करतातच शिवाय वैचारिक मंथन घडवून वाचकांच्या मनावर अधिराज्य करतात. आपल्या कविता जीवनाचा परिचय करून देतात आणि जुन्या नव्या संदर्भाचा सुरेख दाखला देतात. आपली वैखरी प्रत्येकाच्या मन: पटलावर प्रेरणेचा उस्फुर्त प्रतिसाद देऊन जाते.