ह्या बालकविता फारच छान व आटोपशीर आहेत. त्या मुळे बालकांना
कंटाळवाणे वाटणार नाही. ‘पाखरांची शाळा’ ह्यातील सर्वच कविता प्रवाही
व सहज स्फूर्त असून नव्याचा शोध घेणाऱ्या वाटतात. त्यातून व्यक्त होणारे
भाव विचार अंतर्मुख करतात आणि बालकांचे मन रमतील अशा आहेत.