कलाकृती कोणतीही असो ती स्वतःच्या अनुभवातून परिपूर्ण होत असते, प्रतिभावंत अथवा कलावंत यांच्या निर्मितीला अनुभवाची गरज असते. अशा अनुभवातून सौ निता प्रवीण शेंडे आपल्या मनातील भावना वाचकासमोर मांडत आहेत. त्यांचा हा पहिला काव्यसंग्रह आहे. त्या संवेदनशील मनाच्या कवयित्री असून अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. जे सुचलं ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आपल्या काव्यातून मांडले आहे. त्यांच्या कविता वाचकांच्या मनाचा ठाव घेतात आणि विचारही करायला लावतात.
कवयित्री निता शेंडे यांच्या कविता वास्तव असून भाषाशैली व रचना उत्कृष्ट आहे. त्यांच्या कवितांना बरीच पारितोषिक, सन्मानपत्र मिळालेले आहेत 'काव्यंजनिता' हा काव्यसंग्रह म्हणजे त्यांच्या मनातील भावना आहेत.
कवयित्री निता शेंडे या साहित्यप्रेमी व्यासंगी आहेत. त्यांच्या काव्यात निसर्ग आहे. मानवी जीवन आहे. राष्ट्रप्रेम आहे. कौटुंबिक, सामाजिक प्राणी, पक्षी, आदी विषय घेऊन त्यांनी कविता रचल्या आहेत.
या कविता संग्रहाला भरभरून पसंती देतील असा विश्वास आहे. - लेखिका, कवयित्री,श्रव्याख्याती प्रा. विमल वाणी म्हसावद