'प्रेरणा' या कथेमध्येलेखिका स्वतः कोणाचीतरी प्रेरणा असते. पण तीच
व्यक्ती लेखिकेला प्रेरणा देऊन जाते. याचे अगदी सुरेख शब्दांमध्ये वर्णन आहे. या
कथेमधील गावाकडचे वातावरण आपल्याला थेट गावात घेऊन जाते. 'रंग होळीचा'
ही छोटीशी कथा कॉलेजच्या कट्ट्या वर आपल्याला रमवून जुन्या आठवणी जाग्या
करून जाते. 'मानसिकता' या कथेमधून रेवा आणि नंदिनी या दोन मैत्रिणींच्या
माध्यमातून अदिती मॅडम आपल्याला जग कितीही पुढे गेलं तरी स्त्री-पुरुष
नात्याकडे बघण्याची समाजाची मानसिकता आजही बदललेली नाही आणि शेवटी
'ऐकावे जनाचे करावे मनाचे' असे असे सांगून जातात. तर 'जाणीव' या कथेत
आपल्या आईवडिलांच्या संस्कारांची जाणीव आपल्याला आयुष्य जगताना
चुकीच्या गोष्टींपासून कशी परावृत्त करते याचे सुरेख कथन आहे.