संस्कृत अभ्यासक. वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार. समाज माध्यमांत सातत्याने भारतीय तत्वज्ञान, संत साहित्य इत्यादी विषयक लेखन.
Book Summary
सर्वांचे कल्याण व्हावे, या हेतूने प्रस्फुरित अशा या स्तोत्रात १०८
श्लोक आहेत. आणि चार अत्यंत महत्वाच्या प्रार्थना जगदंबेला केलेल्या
आहेत. पहिली प्रार्थना केली आहे की, जगदंबेने आधिभौतिक, आधिदैविक
आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांची शांती करावी. दुसरी प्रार्थना
केली आहे की, अभीष्टफलाची प्राप्ती जगदंबेने करून द्यावी. तिसरी प्रार्थना
आहे की, दारिद्र्य आणि दु:ख यांचा नाश जगदंबेने करावा. चौथी प्रार्थना
आहे की, धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थ त्रयीची सिद्धी जगदंबेने करावी. १००
श्लोकांपैकी प्रत्येक प्रार्थनेचे धृवपद २४ श्लोकांमध्ये आले आहे. म्हणजे
पहिला श्लोक ते चोविसावा श्लोक यांत पहिली प्रार्थना ध्रुवपदात आली
आहे. श्लोक क्र. २५ ते ४८ यांत दुसरी प्रार्थना आली आहे. श्लोक क्र. ४९ ते
७२ यांत तिसरी प्रार्थना आली आहे. श्लोक क्र. ७३ ते ९६ यांत चौथी
प्रार्थना आली आहे. या नंतर श्लोक क्र. १०१ ते १०८ यांत प्रत्येकी दोन
श्लोकांत प्रस्तुत चारही प्रार्थनांचा समावेश आहे.