पुस्तके,कथा, कादंबरी , दिर्घकथा यांचे लेखन करण्यासाठी एक विलक्षण
संवेदनशीलता व निरीक्षणशक्ती आवश्यक असते तेच या शापित सौन्दर्य कादंबरी
वाचताना जाणवते. लेखिकेने एका स्त्रीचे मन व तिची झालेली परवड व तिने
केलेली जीवनाची लढाई अत्यंत साधेपणाने उलगडलेली आहे. आभाच्या जीवनाचा
प्रवास , पतीकडून मिळालेली वागणूक , मित्र- मैत्रिणीकडून केली गेलेली मदत, संपत चाललेल्या कुटुंब व्यवस्थेत आई-वडील व भाऊ-वहिनी यांनी दिलेले पाठबळ
हे सगळे लिखाण कोठेतरी प्रत्येक मनुष्याच्या दैनंदिन जीवनात घडतेय त्यामुळे
आपण कथेच्या प्रेमात पडत जातो.