‘नवी दृष्टी’ हा विजय एस.नाटकर यांचा हा चारोळी संग्रह
चारोळीप्रेमींना नक्कीच नवी दृष्टी देऊन जाईल असाच आहे. या
पुस्तकातील प्रत्येक चारोळीतून काहीतरी घेण्यासारखे आहे. मानवी जीवन
म्हटले की सुख-दुः ख, यश-अपयश, राग-अनुराग, आशा-निराशा, चांगलं-
वाईट अशा दोन विरुद्ध गोष्टी येणारच पण ज्या गोष्टी आपल्या
भवितव्यासाठी, आयुष्यासाठी चांगल्या असतात त्याचाच आपण स्वीकार
करायला पाहिजे तरच या जन्मात आपल्याला आनंद मिळत राहील आणि
आनंद कुणाला नको आहे?