आपला पती सतत नजरेसमोर ब्रह्मचर्य व्रत धारण करून पर्णकुटीत संन्यासी अवस्थेत वावरत असून त्याचा सहवास न मिळत असल्याकारणाने होणारे दुःख , मनाची चलबिचलता व भावनांचे अतिरेक सहन करणे ही सर्वात कठीण परीक्षा . स्वतःचा दोष नसतानाही नशिबी आलेल्या परिस्थितीतील मांडवीची मनोदशा स्वतः अनुभवून मग ती, सौ सुषमा ठाकूर या मनाच्या हळव्या कवयित्रीने लेखणीद्वारे अत्यंत भावपूर्णरित्या साकारली आहे.
“प्रतीक्षा मांडवीची” या दहा सर्गांच्या खंडकाव्याची विस्तृत विवेचना न करता हे कार्य वाचकांवर सोडत आहे. यात यशस्वीपणे दर्शवलेली मांडवीची मनोदशा वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल अशी माझी खात्री आहे.