"सुचल कसं?.दिसल जसं"हे कविता संग्रहाचे छोटे खानी पुस्तक आपल्या हाती देतांना मला आनंद होत आहे. खर तर समाजात जवळपास रोजच घडणा-यां आणि विचारात पाडणा-यां घटनांवर काव्याच्या माध्यमातून केलेले हे सहज पण सजक आणि खुशखुशीत भाष्य आहे. ह्यात असा कुठला ही ठराविक अभिनिवेश नाही. ज्या दिवशी जसं दिसल जे मनाला चांगल वाईट जाणवल त्या दिवशी ते अभिव्यक्त करण्याचा सोपा प्रयत्न केला आहे. आणि यातील प्रत्येक अभिव्यक्ती हे त्या घटनेवरील स्वतंत्र भाष्य आहे.तथा ते व्यक्तिगत आहे.