लेखक जयंत शंकर कुलकर्णी यांनी त्यांच्या 'स्वातंत्र्याचे शिल्पकार' या पुस्तकात अशाच प्रकारच्या… स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून तसंच तळहातावर शीर घेऊन स्वातंत्र्य लढ्यात उडी घेणाऱ्या अनेक भारतीय हुतात्म्यांची सविस्तर ओळख करून दिली आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्यापूर्वीच्या अत्यंत धकाधकीच्या काळात जन्म घेतलेल्या अनेक थोर राष्ट्रभक्तांची शौर्यगाथा यात आहे. तसंच ब्रिटिशांच्या अन्यायी आणि जुलमी राजवटीला निर्भयपणे तोंड देताना, त्यांना काय काय सहन करावं लागलं? त्यांना कौटुंबिक पार्शवभूमी कशा प्रकारची लाभली? त्यांचं बालपण कसं गेलं? त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायला नेमकी दिशा कशी मिळाली? याबाबत 'स्वातंत्र्याचे शिल्पकार'मध्ये लेखकाने सहज सोप्या आणि परिणामकारक भाषेत मांडणी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या कित्येक पिढ्यासाठी हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी ठरणार यात शंका नाही.