प्रत्येक माणसाची विशिष्ठ अशी एक विचारधारा असते त्यात ज्येष्ठ
नागरिक म्हणुन लेखन करण्याचा जेव्हा प्रसंग येतो त्यावेळी त्या व्यक्तीकडे
अनुभवांचा जो खजिना असतो, तो, ती वाचकांच्या पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न
करीत असते. माझ्या लेखनाला मिळालेल्या लाईक्स व त्यावरील प्रतिक्रिया बघून
मला हरखून गेल्यासारखेवाटते, कारण कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नसलेला
मी, माझे लेखन जसे योग्य वाटले तसे लिहीत गेलो व ते वाचकांच्या १००%
पसंतीस उतरलेयाचा मला विशेष आनंद होतो आहे.
या पुस्तकातील लेखांची संख्या ६० आहे. वाचनात सुटसुटीतपणा यावा व
वाचकांना वाचन करणे सोयीचे व्हावे म्हणून निवडक पोस्ट्स च मी माझ्या पुस्तकात
समाविष्ट करत असतो त्या दृष्टीने कोणत्याही लेखाची गुणवत्ता घसरणार नाही
याची मी खबरदारी मी घेतली आहे.