सदर कथेची सुरुवात अतिशय प्रासंगिक होते....सुशिक्षित, सुसंस्कारित असलेल्या डॉक्टर दाम्पत्याच्या घरात होते...आणि कथेचा शेवट अनपेक्षित पण सुखाचा होतो....शेवटापर्यंत खिळवून ठेवण्याचे कौशल्य लेखिकेकडे आहे. दर भागाच्या शेवटी पुढे काय होणार ही उत्कंठा असते हे लेखिकेचे यशच म्हणावे लागेल. कथेतल्या रीमा आणि सुयश या डॉक्टर दंपती बरोबर त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीशी आपण लगेच जोडले जातो... असं वाटतं राहतं की आपणही त्यांच्यातलाच एक भाग आहोत...ईशा असेल दासू असेल किंवा फ्लॅशबॅक मध्ये भेटणारी मोना म्हणजेच मोहिनी...अपूर्व..रोहित... मार्था ..जावेद आणि जेनी...सगळे लक्षात राहतात... तीस भागाची ही कथा संपूच नये असं वाटत राहतं... सगळ्यांच्या आयुष्यात आणखी काय काय घडामोडी होतील याची चुटपुट लागून राहते...- सौ. अमृता सुशांत इनामदार