डोंगऱ्यादेव उत्सव सगळ्या गावाला सुखी करण्याविषयी असतो. गावातील गायी-गुरांनी गोठा भरू दे, स्त्रियांना मुलसुख प्राप्त होऊ दे, धन-धान्याने कोठारे भरू दे, मुला-बाळांना सुखशांती लाभू दे, शेतीत भरभरून पिकं येऊ दे अशी विनवणी ते निसर्ग देवतेला आणि पर्यायाने डोंगऱ्या देवाला करतात. प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी कोणत्याना कोणत्या रूपातील ईश्वरीशक्तीला शरण जात असते. येथे तर आदिवासी संबंध निसर्गालाच शरण जात असतात. डोंगरदेवाच्या आश्रयाला असलेल्या या आदिवासींची संस्कृती निसर्गाशी किती घनिष्ट स्वरुपात एकरूप झालेली असते. ते त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातील काही लोकगीतांमधून आपल्याला नक्कीच दिसून येईल.