माझा जन्म १९४४ चा. त्या काळातील आसमंत, माझे नातेवाईक आणि मित्रमंडळी
तसेच जीवनाचे अनुभव हे सगळे मी कालक्रमानुसार न लिहिता विषयवार लिहिले आहे.
नव्या जमान्यातील पिढीला वेगळे, प्रत्यक्षात न अनुभवलेले असे काहीतरी
माहीत होईल आणि आमच्या अनुभवातून काहीतरी नवे कळेल अशी अपेक्षा आहे.
पुढे येणाऱ्या पिढ्या मधे मराठी वाचन हळूहळू कमीच होत जाणार अशी माझी
अटकळ आहे. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी, मग आपोआपच मराठी वाचनाची गरज आणि
संधि कमीच होईत जाणार. हे लक्षात घेऊन काही भाग मी इंग्रजीत लिहिले आहेत
आणि काही मराठीत. उद्देश हाच की आजपासून पन्नास पंचाहत्तर वर्षांनंतर जे कोणी
वाचतील त्यांना या जीवनाचे थोडेसे दर्शन घडावे!
प्रयोग यशस्वी झाला का ते काळच ठरवणार!
ONLY TIME WILL TELL
WHETHER THIS BOOK MAKES INTERESTING READING
FOR THE FUTURE GENERATIONS OR NOT!
ARUN GADGIL