जात आधारीत शिक्षण व शिक्षण आधारीत जात.
अलिकडे शिक्षण हे जातीवरुन दिलं जात नाही. आजच्या काळात शिक्षण हे कोणताही व्यक्ती कोणत्याही जातीचं घेवू शकतो. जातीवर आधारीत आज शिक्षण उरलेलं नाही. मात्र जात जशी पुर्वी बदलवता येत होती. तशी आज बदलवता येत नाही.
जात पुर्वी बदलवता येत होती काय? तर,त्याचं उत्तर होय असंच येतं. पुर्वी जात ही बदलवता येत असे. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जातीतील धंदा आवडला नाही तर,तो धंदा बदलवत असे. त्यानंतर त्या धंद्यावरुन त्याची जात त्याला मिळत नसे.
मध्यंतरीचा काळ आला व जातीवर बंधनं आली. त्यानुसार कोणीही आपली जात बदलवू नये असं ठरलं. त्याचं कारण होतं कामाचं कसब आणि कोणतेही काम जलद गतीनं व्हावे असे वाटण्याची प्रक्रिया. नंतर जातीवर आधारीत उद्योगधंदे वाढले व ते करण्यासाठी कारागीर हे जातीतूनच तयार करण्याची प्रक्रिया अस्तित्वात आली. त्यानंतर काही दिवस शांततेत गेले व काही दिवसानं त्यातही भेदभाव शिरला.
जातीवर आधारीत धंदे व ते का आले? त्याचं कारण होतं कामाचं कसब व त्या कामाची गती वाढवणं. त्यानुसार कारागीरही तयार झाले व लोकं आवडीनं कोणतही काम, मग ते काम कोणत्याही जातीतील का असेना, करण्याची पद्धती अस्तित्वात आली. ज्यावेळेस भेदभाव नव्हता. परंतु याच दरम्यानच्या काळात एक नवी व्यवस्था समाजात अस्तित्वात आली. ज्या व्यवस्थेनं जातीव्यवस्थेला अधिकच घट्ट केलं. ती व्यवस्था होती गुलामीपणा.
गुलामीपणा व जातीगत भेदभाव कसा आला? त्याचं कारण आहे युद्ध. युद्ध झाल्यानंतर एका राजाचा पराभव होत असे. काही राजे शरण जात असत. राजा हारत असे वा शरण जात असे. त्याचबरोबर राजाची प्रजाही हारत असे वा ती शरण जात असे. तो राजा शरण गेला वा पराभवी ठरला तर त्या दोन राज्यात तह होत. त्यानंतर त्या तहात काही अटी राहात. अटी जशा प्रदेशाच्या राहात. तशाच अटी असत कामाच्या. कामासाठी कष्टप्रद माणसं हवी असायची. जी माणसं अस्वच्छतेची कामं करु,शकतील. ज्या कामाचा राज्यातील लोकांना त्रास येतो. शिवाय ते लोकं गुलाम असायचे व ते गुलाम असल्यानं विद्यमान राजा जी कामं सांगणार. ती त्यांना करावी लागायची. अशातच जातीअंतर्गत न आवडणारी कामं ही गुलामांना करावी लागली व त्या गुलामांची जात ही त्याला घट्ट चिकटविली गेली. पुढे त्या गुलामांच्या वाणीला व त्याच्या वागण्याला पर्यात नव्हता व त्यांना इतर जातीत जाताही येत नव्हते. कामं ही आधीपासूनच होती. मात्र ती कामं व त्या कामाची जात घट्ट चिकटविण्याचं काम विजयी राज्यसंस्कृतीनं केलं
पुर्वी जाती नव्हत्याच. फक्त कामं होती. परंतु जेव्हा गुलामाची संस्कृती तयार झाली. तेव्हाच जात तयार झाली व जाती आधारीत भेदभावही तयार झाला. त्या गुलामांना न बोलता कोणतीही कामं करावी लागायची. ती कामं न केल्यास गुलामांवर अत्याचार होत असत. ज्यातून गुलामांना नग्न करणे, त्यांच्या शरीरावर जळत्या अग्नीचा चटका देणे, त्यांचे हातपाय पाठीमागं बांधून त्यांचा कडेलोट करणे, त्यांना सुळावर चढविणे, ज्यातून त्यांची हत्या होईल. असं होवू नये याची भीती गुलामांमध्ये निर्माण झाल्यानं त्यांनी न बोलता सर्व प्रकारची कामं करणे वा त्या कामाचा सहर्ष स्विकार करणे सुरु केले व जाती अधिकच घट्ट झाल्या.
गुलामांना काही चांगलीच कामं दिली जात नव्हती. त्यांना अतिशय हीन दर्जाची कामं दिली जायची. जी कामं अस्वच्छतेची असायची. त्यातच त्यांच्याबद्दल बरेच नियम बनवले गेले. त्यांच्या राहण्याच्या जागा ठरविण्यात आल्या. त्यातही नियम होते. त्यांनी मोठं घर बांधू नये. त्यांनी वस्तीत घर बांधू नये.
गुलाम हे कोणत्याही जातीचे का असेना. त्यांच्याबाबतीत कोणीच व काहीच भेदभाव करीत नव्हते. परंतु तद्नंतरच्या काळात गुलामांसोबत अभद्र व्यवहार होवू लागला. भेदभाव व हिनतेनं कळस गाठला. आता गुलामांना जेवनही नीट मिळत नसे. सतत उपाशी राहावे लागत असे. ज्यातून त्यांनी हिंस्र पशुगत कच्चे मांस खाणे सुरु केले. एकंदरीत सांगायचं झाल्यास त्यांच्या जरी जाती ह्या उच्च स्वरुपाच्या असल्या तरी ते एका विजयी राज्याचे मांडलिक असल्यानं त्यांच्या जाती बदलल्या. त्यातून गरीब श्रीमंतच नाही तर स्पृश्य अस्पृश्यता निर्माण झाली. त्यानंतर जातीअंतर्गत भेदभाव निर्माण होवून जातीआधारीत भेदभावांला खतपाणी मिळाले.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काल शिक्षणावर आधारीत जात होती. त्यामुळंच जातीप्रथा नव्हती. आज मात्र जातीवर आधारीत शिक्षण आहे. म्हणूनच आज जात अस्तित्वात आहे. तसं पाहिल्यास आज जात नष्ट झाली नाही व ती अस्तित्वात जरी असली तरी आजच्या काळात लोकांना जातीगत धंदे करावे लागत नाहीत. त्यांना दुसर्याही जातीचे धंदे करण्याची मुभा मिळाली असून ही एक महत्वपूर्ण गोष्ट एका महान व्यक्तीनं केलेलं आहे. ते महान व्यक्ती आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून प्रत्येक माणसाला कोणतीही कामे करण्यासाठी मोकळीक मिळवून दिली. जातीवर आधारीत भेदभाव नष्ट केला. त्याचबरोबर जातीची बंधनं नष्ट केली. त्याचबरोबर नष्ट केला जातीअंतर्गत पुर्वी होत असलेला भेदभाव. तो भेदभाव की ज्यातून स्पृश्य अस्पृश्यता होती. ज्यातून अस्पृश्यांना त्रास होता. ज्यातून अस्पृश्यांना स्पृश्य वस्तीत व्यवस्थीतपणे जाता येत नव्हते. त्यांना मोठमोठी घरंही बांधता येत नव्हती. त्यांचा स्पृश्यांना विटाळ होत असे. अन् समजा एखाद्यावेळेस अस्पृश्यांचा हात स्पृश्यांना लागलाच वा साधा स्पर्श जरी झाला तरी विटाळ झाला हे गृहीत धरुन अस्पृश्यांना छळलं जात असे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं व अस्पृश्यांना स्पृश्यांच्या बरोबरीनं बसण्यासाठी जागा मिळवून दिली. त्याच संधीचा लाभ होवून आता अस्पृश्यांनाही मोठमोठी घरं बांधता येतात. त्यांना स्पृश्यांच्या घरी विवाह समारंभात सन्मानानं जाता येते. त्यांना स्पृश्यांच्या बरोबरीनं एकत्र जेवन करता येते. आता काल जे पशुगत त्यांचं जीवन होतं. ते जीवन अनुभवावं लागत नाही. त्यात बरीच सुधारणा झालेली असून आज अस्पृश्यांनाही मानवासारखं वागवलं जात आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी आजही काही ठिकाणी अस्पृश्यांवर अत्याचार केला जातो. कधी अनन्वीत अत्याचार केला जातो. कधी त्यांना हिनतेनं वागवलं जातं तर कधी त्यांना पशुसारखं वागवलं जातं. काही ठिकाणी याच अस्पृश्यांना नोकरीच्या अधिकारांपासून डावललं जातं. जरी आज संविधानाचं राज्य असले तरी आणि संविधानाच्या या राज्यात प्रत्येकाला स्वतंत्र्यपणे जीवन जगण्याचा अधिकार असला तरी.
विशेष सांगायचं झाल्यास अस्पृश्यही एक जीवच आहे स्पृश्यांसारखा. त्यालाही स्पृश्यांच्या बरोबरीचं स्थान मिळावं. लोकांनी त्याला समजून घ्यावे. त्यालाही हक्कं द्यावे. त्थांच्या अधिकाराच्या जागा हिरावून घेवू नये. तरच अस्पृश्य अस्पृश्य राहणार नाही. तोही खऱ्या स्वरुपात स्वतंत्र झाला असे म्हणता येईल.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०