ह्याच ठिकाणी अत्रे, पुलं, गोनीदा, दमामिरासदार आदि मान्यवर शब्दांचे चौकार-षटकार ठोकणाऱ्या लेखकांना पुस्तक रुपाने भेटत असे. रणजित देसाई यांच्या 'श्रीमान योगी' ने शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापा ऐकवल्या तर त्यांच्या 'स्वामी' ने थोरले माधवराव पेशवे यांची चरीत्र गंगा वाचुन मन दिपुन गेले. शिवाजी सावंत यांच्या 'मृत्युंजय' मधुन महाभारतातील कर्णाचा जिवनाचे अनोखे पैलू अनुभवलं.