खरोखरच प्रेमाच्या पाकात बुडालेल्या या प्रेमकथा आहेत. प्रत्येक कथेत स्त्री-पुरुषांच्या नात्यातले प्रेम हा स्थायीभाव असला तरी प्रेमाचे रंग मात्र वेग वेगळे आहेत. असे या कथा वाचताना जाणवते. कथा यौवनतल्या, कथा प्रौढावस्थेतल्या, अगदी उतार वयातल्या प्रेमाच्या ही कथा यात वाचायला मिळतात. या कथा वाचताना आणखी एक लक्षात येतेकी यात सभ्यता, मर्यादा, कुठेही ओलांडलेली नाही. अश्लीलता, ओंगळपणा जाणवत नाही. त्यामुळे
या कथा वाचताना मनात फक्त आनंद तरंगच उमटतात. थोडा विरह, थोडी वेदना, तुटणे, जुळणे, या सगळ्यांचा एक रंजक हळुवार अनुभव वाचकाला मिळतो. जशी
मनात आली तशी कागदावर उतरली इतक्या सहजपणेया सर्वच कथा लिहिल्या गेल्या आहेत.- राधिका भांडारकर