अगदी वर्णन केल्याप्रमाणे जिलबी सारख्याच पाकात मुरलेल्या, गोड गोड आहेत. प्रत्येक कथा वेगळ्या लेखक किंवा लेखिकेची आहे, त्यामुळे प्रत्येक कथा वेगळी आहेच. प्रत्येकाची भाषाशैली वेगळी आहे. विषय एकच
असला तरी कथानकाची मांडणी वेगवेगळी आहे.
प्रेमाचे सर्वच रंग,व सर्वच रूपे या कथांतून आपल्याला भेटतात. प्रेमाच्या विविध छटा, या कथासंग्रहात आपल्याला भेटतात, व वाचकाचे मन गुंतवून ठेवतात. प्रेमकथा म्हणजे श्रुंगार रस...सर्व रसांचा राजाच. मग अशा रसात सजलेल्या कथा वाचकांना कां आवडणार नाहीत? नक्कीच आवडतील. रसिक चोखंदळ वाचक या पुस्तकाचे मनापासून स्वागत करतील अशी खात्री वाटते.
-डॉ.सौ. अनुराधा भागवत.